आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानात रोज नवीन - नवीन बदल होत आहेत. मोबाईल आणि संगणकाने तर अफाट क्रांती केली आहे. आजच्या या गतिमान युगात आपणही अपडेट राहणे गरजेचे आहे, असं म्हणतात कि, काळाप्रमाणे आपण बदलले पाहिजे आज संपूर्ण जगच संगणकीय क्रांतीमुळे व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बदलत आहे. त्यामुळे भूतकाळातील गोष्टी सतत डोक्यात ठेवण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरे डिजिटल इंडियाचे स्वप्न लपलेले आहे.